Pages

मंगळवार, २९ मार्च, २०११

घर सोडलं तेव्हा वाटलं नव्हत कधी,
इतक्या दूर येऊन, भारतीयांशी होईल कट्टी,
ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा केलेली,
त्यांच्याकडून फक्त निराशाच मिळाली,
पण मदत मिलन मात्र थांबल नाही!

इथे येऊनही वाईट सवय मात्र सोडली नाही,
केले आहेत नीर-निराळे गात भारतीयांनी,
एकाशी गट्टी होता दुसर्याशी कट्टी,
अन लिडरच्या मागून करावी पोपटपंची.

एक वर्ष घेऊन हा अनुभव,
आता स्वतंत्र राहत आहे,
सर्वांशी गोड गोड बोलते,
पण मैत्रीच्या नात्यापासून दूर आहे!

ज्यांनी मदतीचा दिला हात,
त्यांचे आभार मानते!
ज्यांनी फिरवली पाठ,
त्यांना नजरेआड घालते!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा